"First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win." - Mahatma Gandhi"
Showing posts with label खर्‍या समस्या.... Show all posts
Showing posts with label खर्‍या समस्या.... Show all posts

Sunday, February 21, 2010

खर्‍या समस्या...

बरेच दिवस झाले , मी विचार करत होतो, सद्ध्या महाराष्ट्राच्या खऱ्या समस्या काय आहेत ...
एक छोटी लिस्ट बनवली आहे ...


महाराष्ट्राच्या खर्‍या समस्या...
१. परप्रांतीय/ .हिंदी विरुद्ध मराठी भाषा.
२. शाहरुख खान, माई नेम ईज़ खान .आणि त्या साठी दिलेली सुरक्षा.
३. सत्य साई बाबा त्यांची मुख्यमंत्र्यांनी केलेली पूजा ...!
४. मनसे विरुद्ध शिवसेना विरुद्ध थोड्याफार प्रमाणात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी
५. राज विरुद्ध अमिताभ विरुद्ध अबु आजमी : उद्धव विरुद्ध राहुल गांधी.


लिस्ट खूप मोठी आहे हो ...


माझ्या मते...सामान्य माणसाचे प्रश्न हे सामान्य माणसाचेच आणि सामान्य माणसासाठीच असतात.
आणि ती काय सामान्य माणसे आहेत का ???


लोक पण उगाच अपेक्षा ठेवतात त्यांच्या कडून.


लोकसंख्या वाढ, रस्ते, शिक्षण, शेतकऱ्याचा आत्महत्या, प्रदूषण, पाणी पुरवठा..


यासगळ्या समस्या


मध्य मुंबई मध्ये,
ए सी बंगल्यात बसून,
५ स्टार हॉटेल मध्ये सभा घेऊन,
५०-६० पोलिसांच्या सुरक्षा कवचातून,
२५-३० लाखाच्या गाडीतून
थोडीच कळणार राव ???